केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले

कुरुक्षेत्र विद्यापीठात कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला Pahalgam Terror Attack हे अमानवी कृत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवेल.
पाकिस्तानच्या नापाक हेतूंना युद्धाने प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून विकासाचा मार्ग खुला केला. त्यानंतर 3 कोटी पर्यटक काश्मीरमध्ये पोहोचले. काश्मीरमधील जनता दहशतवाद आणि पाकिस्तानसोबत नाही.
पाकिस्तान दहशतवाद वाढवत आहे – आठवले
रामदास आठवले म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पाकिस्तानचा पाणीपुरवठा खंडित केला. सध्या पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तेथील सरकारने भारताशी चांगले संबंध ठेवून देशाच्या विकासासाठी काम करायला हवे होते.
काश्मीर काबीज केले पाहिजे
आठवले म्हणाले की, पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतले पाहिजे. त्यासाठी भारताला पाकिस्तानशी युद्ध करावे लागले तरी चालेल. यावेळी विरोधकांनी सरकारला साथ द्यावी.